Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शिक्षण महर्षी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणपत आत्माराम पाटील यांचे निधन

ठाणे ( विनोद वास्कर ) : कल्याण -शीळ रस्त्यालगत असणाऱ्या पडले गावातील येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणपत आत्माराम पाटील (वय ९५) यांचे २९ मे २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष साहिल पाटील यांचे ते आजोबा होते.

गणपत पाटील हे गाव व पंचक्रोशीतील सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते. पडले ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,शिक्षण महर्षी व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते होते. अखंड आयुष्यभर पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पंचक्रोषित व तालुक्यात गावपंच घेऊन न्याय मिटवले म्हणून त्यांना ''न्यायाचा बाण'' असे म्हणतात. त्यांनी पडले गावात शाळा, पोस्ट ऑफिस, व विविध समाजपयोगी कामे गावात राबविली. गाव विकासाची अखंड धुरा त्यांनी सांभाळली. त्यांना ठाणे महानगरपालिकातर्फे 'गुणीजन नागरिक' पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले होते. 

त्यांच्या पश्चात पाच मुलं, तीन मुली, जावई दोन भाऊ, तीन पुतणे, सात नातवंडे असा परिवार आहे. पडले गावातील स्मशानभूमीत दिनांक २९ मे रोजी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |