रिक्षा बंद आंदोलन... बेमुदत उपोषणाचा इशारा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीत चौथी सीट बसविल्यास दहा हजार रुपये दंड आकराला जात आहे. आधीच हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांवर एवढा मोठी दंङरक्कम आकारून अन्याय करत असल्याचे रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन व रिक्षा चालक संघटना डोंबिवलीने सांगितले. दोन्ही संघटनेने डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांची भेट घेऊन रिक्षा चौथी सीट बसविल्यास रिक्षाचालकाला तब्बल दहा हजार रुपयांचा दंङ अशी कारवाई नको अशी मागणी केली.याबाबत पोलिसांनी गंभीर्याने विचार करून कारवाई करू नये अशी पोलिसांना विनंती करून निवेदन देण्यात आले.
रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष कोकण विभाग प्रणव पेणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहर अध्यक्ष महेश पाटील, विजय बाकडे, दत्ता वाठोरे,
गजानन पाटील, प्रदीप ढवळे,समाधान पवार,शंकर यादव
विलास चौधरी यांनी डोंबिवली वाहतुक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांची भेट घेतली.यावेळी डोंबिवली शहरअध्यक्ष महेश पाटील म्हणाले, डोंबिवलीतील 80 टक्के नागरिक कामानिमित्त मुंबईला जातात. सायंकाळी परत डोंबिवली आल्यावर घरी जाणारे प्रवासी चौथी सीटवर बसतात. मात्र रिक्षाचालकांना भरावा लागतो. दंडाची रक्कम मोठी असल्याने दंङ भरणे शक्य होत नाही.डोंबिवलीतील अनेक रिक्षाचालक कर्जबाजारी आहेत.
रिक्षाचालक संघटना डोंबिवली अध्यक्ष राजा चव्हाण, सरचिटणीस भगवान मोरजकर, सचिव विजय गावकर यांनीही फ्रंट सीट प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकाला दहा हजार रुपये दंड आकारला जात असल्याबद्दल प्रश्न विचारून आंदोलनाचा इशारा दिला आहे. याविषयी मोरजकर यांनी सांगितले की, वाहतूक विभागाने 66 व 192 कलमानुसार रिक्षाच्या फ्रंट सीट प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकाला दहा हजार रुपये दंड आकारला आहे. हा दंड सर्वस्वी अमानुष आहे. रिक्षाचालक रोज रस्त्यावरच्या त्रासाला तोंड देत कसाबसा आपला व्यवसाय करत आहेत. ते म्हणाले कसेबसे मासिक उत्पन्न पोटापाण्यापुरते मिळवत आहेत. अशावेळी रिक्षा चालकाला दहा हजार रुपये दंड कसा पुरवडेल त्याचे जगणे मुश्किल होईल. आधीच दबगाईला आलेला व्यवसाय कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा शासन पुरवत नाही आणि म्हणून या दंडास आमचा कडकडून विरोध आहे. आपण रिक्षाचालकांच्या भवितव्याचा विचार करून लवकरात लवकर याबाबत काहीतरी चांगला मार्ग काढावा अशी मागणी केली आहे.