ठाणे : दि. ठाणे- पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत “ठाणे तालुका” मतदारसंघातून युवा नेतृत्व श्री. आकाश बाबाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज दि. २ जून रोजी छाननी चा दिवस असल्याने त्यांच्या विरुद्ध दुसरा अर्ज न आल्याने त्यांना बिनविरोध विजयी घोषित करणायत आले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, संसदरत्न खासदार श्रीकांत जी शिंदे, कल्याण तालुकाप्रमुख गोपाळ जी लांडगे व कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश जी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने त्यांनी ही निवडणूक लढवली. त्यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्रात नव्या पिढीच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याची भावना व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री. आकाश पाटील हे उच्चशिक्षित, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आधुनिक व्यवस्थापन, वित्तीय नियोजन आणि विकासाभिमुख विचारसरणी यांचा उत्तम समन्वय साधत त्यांनी सामाजिक, व्यावसायिक आणि सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवकांशी असलेला त्यांचा घनिष्ठ संपर्क, जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता आणि विकासासाठीची बांधिलकी यामुळे त्यांना सर्व स्तरांतून मोठा पाठिंबा लाभला.

