Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

महापालिकेच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होतील ह्याची दक्षता घ्यावी - महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़


कल्याण : महापालिकेच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होतील ह्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आज दिले. जनतेला, नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून शासनाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करुन, त्यावर प्रभावी कार्यवाही करणेबाबत निर्देश मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने कार्यवाही करणेकामी आयुक्त दालनात आयोजिलेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत बोलताना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी हे निर्देश दिले.

आपापल्या कार्यालयातील अभिलेखांचे वर्गीकरण करुन आवश्यकता नसल्यास सदर अभिलेख तपासणीअंती योग्य प्रक्रियेनुसार नष्ट करावेत. आवश्यक अभिलेखांचे व्यवस्थित जतन करण्यासाठी अभिलेख कक्ष सुव्यवस्थित ठेवावा. अनावश्यक असलेले साहित्य, भंगार इ. योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करावी. आपले कार्यालय स्वच्छ व सुंदर राहील, याची दक्षता घ्यावी.

आपले कार्यालय सिटीझन फ्रेंडली ठेवावे, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे कामांचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीकोनातून प्रभाग कार्यालयात उपअभियंता स्तरावर काही प्रमाणात आर्थिक अधिकार देण्यात यावेत. तसेच नागरिकांना त्यांच्या अडचणी, समस्यांबाबत अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वेळ ठरवून देण्यात यावा, अशाही सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या आणि याबाबत झालेल्या अंमलबजावणीची माहिती घेण्यासाठी पुन्हा काही दिवसांच्या कालावधीत बैठक घेण्यात येणार असल्याबाबत त्यांनी यावेळी सूचित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |