Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करू ; भाजपा प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेचा इशारा


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  महाराष्ट्र राज्याच्या अध्यादेशानुसार रिक्षा किंवा इतर कालबाह्य झालेल्या वाहनांना शासकीय परवानगीनुसार भंगार मध्ये (स्क्रॅप) काढण्यात येते. वाहनधारकाला त्या गाडीची किंमत वजना प्रमाणे मिळणे अनिवार्य असून देखील कल्याण उपप्रादेशिक परिवहन कडून मिळणाऱ्या रकमेमध्ये भरपूर तफावत असल्या कारणाने भारतीय जनता पार्टी रिक्षा चालक मालक संघटने 16 तारखेला कल्याण येथील उबांर्डे येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात एक दिवसीय उपोषण करण्यात आले होते.अधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल घेत उपोषणकर्त्यांची चर्चा करून शासनाच्या अध्यादेशानुसार स्कॅपच्या रिक्षाचे वजनानुसार वाहनचालकांना योग्य मोबादला दिला जाईल असे आश्वासन दिले. आश्वासनानंतर अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली नाही तर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा भाजप रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांनी दिला आहे.लिंबू सरबत पिऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.


भाजपा प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेने कल्याण उपप्रादेशिक विभागाविरोधात एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या जीआर नुसार रिक्षा किंवा इतर कालबाह्य झालेल्या वाहनांना शासकीय परवानगीनुसार भंगार मध्ये (स्क्रॅप) काढण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार वाहनधारकाला त्या गाडीची किंमत वजना प्रमाणे मिळणे अनिवार्य असून देखील कल्याण आरटीओ कडून मिळणाऱ्या रकमेमध्ये भरपूर तफावत असल्या कारणाचे सांगत भारतीय जनता पार्टी रिक्षा चालक मालक संघटने तर्फे उपोषण केले होते. उपोषण दरम्यान भाजपा पदाधिकारी तिथे आल्यानंतर अधिकारी संतोष बारकुल

आणि प्रशांत सूर्यवंशी यांनी बोलणी करण्याकरिता रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर तसेच महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती जमाती मोर्चा सरचिटणीस शशिकांत कांबळे,रवी जाधव, संतोष आतकरे, जयनाथ यादव, किशोर सारखांदे, संजय प्रजापती, रवि सावळे, दीपक पवार, रमेश लोते यांना बोलाविले. अधिकाऱ्यांनी चर्चेत आश्वासन दिले की शासनाच्या जीआर नुसार वजन करून त्याचा मोबदला अंदाजे १० ते १२ हजार रुपये मिळेल.

सकारात्मक बैठकी नंतर अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांना लिंबू सरबत पाजून उपोषण सोडविण्यात आले. सर्व रिक्षा चालकांनी आणि इतर वाहन धारकांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण व सर्व भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे तसेच रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांचे आभार मानले.शासनाच्या अध्यादेशानुसार वजनकरून वाहनचालकांना योग्य मोबदला दिला जाईल असे आश्वासन दिले. मात्र जर आश्वासनानुसार वाहनचालकांना योग्य मोबदला मिळाला नाही तर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |