ठाणे ( विनोद वास्कर ) : श्री खरवली आई सेवा ट्रस्ट शिळगांव यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन वार सोमवार दिनांक २३ जून २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता मौजे शिळ, (खरवली देवी परिसर) भोलानाथ नगर, पोस्ट- डावले ता.जि.ठाणे, या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य वन मंत्री, पालघर जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक,माजी आमदार मनसे राजूदादा पाटील, माजी आमदार उबाठा सुभाष भोईर, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष नंदू परब,भाजपा शिळ दिवा युवा मोर्चा अध्यक्ष साहिल पाटील,माजी नगरसेवक बाबाजी पाटील,माजी नगरसेवक हिरा पाटील, वनविभाग अधिकारी संदीप मोरे, शिळ-डायघर पोलीस वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ,मानव सेवा प्रतिष्ठान शिळगांव चे अध्यक्ष सुनिल आलिमकर, ॲडव्होकेट बाबुराव मुंडे, माजी नगरसेवक राजू अन्सारी, माजी नगरसेवक कमरुला,हाशा रामा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शिळगांव चे मुख्याध्यापक हनुमान आलिमकर, शिक्षक, विद्यार्थी, खरवली नगर शिळगाव ग्रामस्थ टोरंट पावर अधिकारी, दक्षिण नागरिक संघटनेचे पदाधिकारी, आई गावदेवी रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी, या सर्वांची उपस्थिती असणार आहे.
दिवा - शिळ सारख्या शहरात पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी श्री खरवली आई सेवा ट्रस्ट कडून प्रेत्येक वर्षी वृक्ष लागवड करण्याची धडपड सुरूच असते, तसेच ट्रस्टच्या माध्यमातून श्री खरवलीच्या परिसरात आतापर्यंत २०० वृक्ष लागवड करून १७० ते १८० झाडे जिवंत राहिली आहेत. तरी या वर्षात ११००/- वृक्षरोपण लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे, वृक्ष आमचे सर्वधन तुमचे अशी मोहीम राबवणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष श्री.वैभव आलिमकर यांनी सांगितले आहे.
तसेच गेल्या काही वर्षभरात शहरात समाजात काम करणारे राजकीय नेते, समाजसेवक,वकील, डॉक्टर, पोलीस, वनविभाग अधिकारी, दिवा प्रभाग समिती अधिकारी, पत्रकार, शालेय शिक्षक विद्यार्थी, उद्योजक, क्रीडा खेळाडू, निसर्ग प्रेमी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ असे १०० सदस्य पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण संवर्धन कार्य श्री खरवली आई सेवा ट्रस्ट च्या नेतृत्वाखाली कार्यक्रम करत आहे. यात महिलांचा सुद्धा समावेश आहे.या सामाजिक कार्यात नागरिकांचाही सहभाग वाढावा, स्वतः रोपटे लावण्यासाठी तयार व्हावे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही या उदात्त कार्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
लावलेली रोपटी जिवंत आहेत की नाहीत, याची पाहणी करतात. विशेष म्हणजे, आतापर्यंत २०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यापैकी १८० वृक्ष जगविले आहेत. त्यांचे संवर्धन केले जात आहे. या कार्यात वनविभाग, सामाजिक संस्था, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक वनविभाग याचे सहकार्य मिळाले असल्याचे शिळगांवचे ( पोलीस पाटील ) व ट्रस्टचे कार्याध्यक्ष श्री. संतोष भोईर यांनी सांगितले.
वाढती लोकसंख्या आणि विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे जुनी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. तेव्हा यावर्षी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. याचा श्री खरवली आई देवस्थान येथून प्रारंभ करण्यात येणार आहे. ट्रस्टच्या वतीने वृक्ष लागवड केली जाईल. त्याचे संवर्धन नागरिकांनी करायचे आहे. 'वृक्ष आमचे, संवर्धन तुमचे' ही मोहीम राबवून जास्तीत जास्त वृक्ष लागवड ट्रस्टचे उद्दिष्ट आहे असे ट्रस्टचे सचिव श्री. शरद पाटील यांनी सांगितले.
खरवली आई परिसरातील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजी पूर्वक वापर तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन, मानव निर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालण्यासाठी हा प्रयत्न आहे असे ट्रस्टचे खजिनदार श्री. संजय आलिमकर यांनी सांगितले.